जामखेड न्युज – – – –
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने जामखेड तालुक्यातील गट आणि गण रचना जाहीर करण्यात आली आहे . सदर गट आणि गण रचना २०११ च्या लोकसंखेच्या अनुषंगाने गृहीत धरून तयार करण्यात आली आहे. मागील २०१७ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकमध्ये जामखेड तालुक्यात २ गट आणि ४ गण तयार करण्यात आले होते. २०१७ साली अहमदनगर जिल्ह्याचे एकूण ७५ गट होते,२०२२ च्या निवडणुकीसाठी गट संखेमध्ये १० ने वाढ होऊन ८५ गट तयार करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने जामखेड तालुक्यामध्ये ३ गट आणि ६ गण तयार करण्यात आले आहेत. २०११ च्या लोकसंखेप्रमाणे एकूण लोकसंख्या ११८८२९ असून अनुसूचित जातीची लोकसंख्या १६०६६ आहे तसेच अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३०९२ इतकी आहे.
यानुसार जामखेड मधील ३ गट आणि ६ गट खालीप्रमाणे आहेत.
गटाचे नाव ८३ साकत
गणाचे नाव १६५ साकत
या गणामध्ये साकत,कोल्हेवाडी,पिंपळवाडी, मोहा, सावरगाव, देवदैठण, नाहुली, धामणगाव, जायभायवाडी, दिघोळ, अशा एकूण ८ ग्रामपंचायत आणि ११ गावांचा समावेश आहे.
गणाचे नाव १६६ शिऊर
या गणामध्ये शिऊर, नायगाव ,तेलंगशी,मोहरी ,राजुरी, डोळेवाडी,आनंदवाडी,सारोळा ,काटेवाडी ,पाडळी, जातेगाव, खुरदैठण बांधखडक अशा एकूण ११ ग्रामपंचायत आणि १३ गावांचा समावेश होतो.
गटाचे नाव ८४ जवळा
गणाचे नाव १६७ जवळा
या गणात कवडगाव,गिरवली, पिंपरखेड,हसनाबाद,बावी, हाळगाव,चौंडी ,आघी, मतेवाडी,जवळा,राजेवाडी ,धोंडपारगाव, अशा एकूण १० ग्रामपंचायत आणि १२ गावांचा समावेश होतो.
गणाचे नाव १६८ अरणगाव
या गणात अरणगाव, पारेवाडी ,डोणगाव,फक्राबाद,पाटोदा,खामगाव, भवरवाडी,रत्नापूर,सांगवी,कुसडगाव,सरदवाडी,खांडवी, डिसलेवाडी,धानोरा ,वंजारवाडी, झिक्री अशा एकूण ९ ग्रामपंचायत आणि १६ गावांचा समावेश होतो.
गटाचे नाव ८५ खर्डा
गणाचे नाव १६९ खर्डा
या गणात खर्डा,नागोबाची वाडी ,मुंगेवाडी,पांढरेवाडी,दरडवाडी ,लोणी, आपटी,वाकी,बाळ गव्हाण,सातेफळ,पिंपळगाव आळवा,घोडेगाव,अशा एकूण ८ ग्रामपंचायत आणि १२ गावाचा समावेश होतो.
गणाचे नाव १७० नान्नज
या गणामध्ये नान्नज ,पोतेवाडी,वाघा,पिंपळगाव उंडा,तरडगाव ,वंजारवाडी,दौन्डाची वाडी,सोनेगाव,जवळके,धनेगाव,चोभेवाडी, मुन्जेवाडी,बोर्ले,गुरेवाडी,महारुळी अशा एकूण १२ ग्रामपंचायत आणि १५ गावांचा समावेश होतो.
सदर गट गण रचनेबाबत कुणाला हरकती असल्यास आपल्या हरकती दिनांक २/६/२०२२ ते ८/६/२०२२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडेस दाखल कराव्यात .त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही . हरकत घेण्यासाठी प्रमाणित कागदपत्रें जिल्हाधिकारी कार्यालय ग्रामपंचायत शाखा यांचे जवळ मिळतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.



