धुळीचे व खड्डयांचे शहर जामखेडची नवी ओळख!!

0
574

जामखेड न्युज——

धुळीचे व खड्डयांचे शहर जामखेडची नवी ओळख!!

 

 

जामखेड साठी दोन आमदार असतानाही शहरात सह नगर रोड व बीड रस्त्याची अत्यंत दुरावस्था आहे. यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळ, रस्त्यावरील खड्डे यामुळे चिंचपूर ते जामखेड व जामखेड ते सौताडा रस्त्याची खुपच दुर्दशा झाली आहे. यामुळे अनेक लोक जामखेड सोडून नगर पुण्याला स्थलांतरित होऊ लागले आहेत. सगळीकडे धुळीचे साम्राज्य, फुपाटाच फुपाटा आणी खड्डेच खड्डे अशी जामखेड शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे.

एकेकाळी चोवीस तास पाणी मिळणारे शहर तसेच तालुक्यात चौंडी हे अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर एक पर्यटन स्थळ, तसेच मराठे व निजाम यांची शेवटची लढाई झालेला खर्डा येथील भुईकोट किल्ला, जवळच प्रसिद्ध रामेश्वर धबधबा, तसेच मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून जामखेड कडे पाहिले जाते सध्या जामखेड परिसरातील रस्त्याची पुरती वाट लागली आहे. पावसाळ्यात सगळीकडे चिखलच चिखल उन्हाळ्यात धूळ च धूळ यातच आता खड्डेच खड्डे यामुळे लोक जामखेड वगळून दुसऱ्या मार्गाचा पर्याय निवडत आहेत व जामखेड ला नवीन ओळख धुळीचे व खड्डयांचे शहर म्हणून निर्माण झाली आहे. दोन आमदार असतानाही या समस्येकडे साफ दुर्लक्ष आहे.

चिंचपूर ते जामखेड व जामखेड पंचदेवालय ते सौताडा या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. एका वर्षापासून काम सुरू आहे रस्ता खोदून ठेवला आहे. त्यावर मातीमिश्रीत मुरूम यामुळे पावसाळ्यात चिखल दलदल, तर पाऊस उघडला कि, धुळच धुळ तसेच खड्डे यामुळे जामखेड परिसरातील नागरिक वाहनधारक हैराण झाले आहेत. अनेक जण तर जामखेड म्हटले तरी नको रे बाबा असे म्हणतात. एक वर्ष झाले तरी राष्ट्रीय महामार्ग कामाची गती नाही. शहरात अद्याप तशीच परिस्थिती आहे. सध्या धुळीने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातच खड्डयांमुळे अनेकांना मनक्याचे आजार झाले आहेत. तर गाड्या खिळखिळ्या झाल्या आहेत.


अनेक लोक जामखेड वगळून दुसऱ्या मार्गाची निवड करत आहेत तर अनेक प्रतिष्ठित नागरीक जामखेड शहर सोडून नगर पुण्याला स्थायीक होऊ लागले आहेत. त्यामुळे ताबडतोब रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा व नागरिकांचे स्थलांतर थांबवावे अशी मागणी होत आहे तर अनेक लोक म्हणतात जामखेड म्हणजे धुळ व खड्डयांचे शहर आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यातून जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी. रस्ता १५७.६२ कोटी रुपयांचा रस्ता ठेकेदार ईपीसी कंत्राटदार, धनेश्वर कन्स्ट्रक्शन, गणेश कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांनी ८६.०९ कोटी रुपयांना काम घेतले आहे. या कामाचे भूमीपूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार प्रा राम शिंदे यांनी दि. २४ फेब्रुवारी २४ रोजी केले आहे. अठरा महिन्यात काम करण्याचा कालावधी आहे आठ महिने झाले तरी फक्त रस्ता खोदून माती मिश्रीत मुरूम टाकल्याने सध्या अनेक गाड्या घसरत आहेत. मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. शहरातील अतिक्रमणे तशीच आहेत. लहान लहान टपरी धारकांनी आपापले अतिक्रमण काढले पण शहरातील मोठ मोठे अतिक्रमण तसेच आहेत कामाची गती खुपच संत गतीने होत आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत.

जामखेड शहराची धुळ व खड्डयांबाबत होत असलेली बदनामी थांबवून नवीन चकाचक रस्ते व धुळमुक्त जामखेड होण्यासाठी दोन्ही आमदार व खासदार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here