जामखेड न्युज – – – – –
पाऊस सुरू… धोका वाढला! जामखेडकरांसाठी नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांचा सुरक्षा संदेश

राज्यात पावसाने जोर धरला असून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी कोणतीही जोखीम घेऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी केले आहे.

पावसाळ्यातील संभाव्य धोके आणि नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी यासंदर्भात प्रांजलताई यांनी एक व्हिडिओ संदेशाद्वारे जामखेड तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधला आहे.

प्रांजलताईंचा महत्वाचा सुरक्षा संदेश
व्हिडिओमध्ये प्रांजलताईंनी नागरिकांना पुढील सूचना केल्या:
1. नदी-नाल्यांपासून दूर रहा : पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पूल, बंधारे आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळावे.





