शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले व रत्नदीप काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरु रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थींचे इतर मेडिकल कॉलेजमध्ये तात्काळ स्थलांतर करावे

0
1669

जामखेड न्युज——

शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले व रत्नदीप काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरु

रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थींचे इतर मेडिकल कॉलेजमध्ये तात्काळ स्थलांतर करावे

 

जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सर्व शाखा मधिल सर्व विद्यार्थ्यांचे अश्वासन देऊनही इतर कॉलेज मध्ये तात्काळ स्थलांतर झाले नाही. त्यामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी आज दि २७ जुन पासुन जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांच्या समवेत तहसीलदार व पोलीस निरीक्षक निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. आज सकाळी दहा वाजता रत्नदीप काॅलेजच्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी विद्यार्थ्यासमवेत पांडुरंग भोसले यांचे उपोषण सुरु झाले आहे. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.

तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नदीप मेडिकल फौंडेशन चे अध्यक्ष भास्कर मोरे याने वरील विषयानुसार उल्लेख केलेल्या विद्यापीठाच्या माध्यमातून विविध शाखा करुन विद्यार्थींनी व विद्यार्थींचे आर्थिक, मानसीक, शारिरीक शोषण करुन मोठे नुकसान केले आहे. त्यासंदर्भात रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या शाखेतील सर्व विध्यार्थी, ग्रामस्थ, विविध संघटना व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी मार्च २०२४ मध्ये दीर्घ काळ आंदोलन सुरू केले होते.

त्यानंतर त्याची दखल घेऊन संबधित विद्यापीठ, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आ. रोहित पवार आ. प्रा राम शिंदे खा.निलेश लंके यांनी गांभीर्याने दखल घेऊन सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. यावर विश्वास ठेऊन हे आंदोलन व पांडूराजे भोसले यांनी नऊ दिवसानंतर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले होते. मात्र तीन महीने होऊनही संबंधित विद्यार्थांचे कॉलेज इतर कॉलेज मध्ये स्थलांतरित झाले नाही. दोन्ही शाखांमधील विद्यार्थींचा रत्नदीप मेडिकल कॉलेजने वसुल केलेल्या फिस चा प्रश्न, शिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले, तसेच बी फार्मसी विद्यार्थींनी व्यावसायिक परवाना काढण्यासाठी कॉलेज कडुन आवश्यक ती कागदपत्रे व सह्य शिक्के देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.

याबाबत मुळ विद्यार्थींचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच ३ महीन्यांपासून चालु असलेल्या प्रोसेस मध्ये विद्यार्थींच्या कॉलेज ट्रान्स्फर संबंधित कुठेही हवा तसा प्रतिसाद पुढील युनिवर्सिटी कडुन भेटला नाही. संबंधित विद्यापीठा कडुन विद्यार्थींचे शैक्षणिक नुकसान झाले तर यास वरील युनिवर्सिटी जबाबदार राहील असे देखील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढील शैक्षणिक वर्ष १० ते १५ दिवसात सुरू होत असल्याने निवेदनाचा विषय गांभीर्याने घेण्याची मागणी केली आहे.

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अध्यक्ष भास्कर मोरे याने वरील विषयानुसार उल्लेखित विद्यापीठाच्या माध्यमातून विविध शाखा सुरू करून विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांचे आर्थिक , मानसीक , शारिरीक शोषण करून खूप मोठे नुकसान केले आहे. त्या संदर्भात रत्नदीप मेडिकल कॉलेजचे दोन्ही शाखेतील सर्व विद्यार्थी , ग्रामस्थ , सर्व संघटना यांनी मार्च २०२४ मध्ये दीर्घ काळ आंदोलन व पांडुरंग भोसले यांनी आमरण उपोषण केल्या नंतर याची दखल घेऊन विद्यापीठ , मा . मुख्यमंत्री , मा . जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर , मा. आमदार रोहीत पवार साहेब , मा. आमदार राम शिंदे साहेब , मा. आमदार निलेश लंके यांनी दखल घेऊन या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व या विश्वासावर हे आंदोलनं स्थगित करतांना उपोषण कर्ते पांडूरंग भोसले यांनी जलपांन घेऊन उपोषण थांबवले होते.
या घटनेला आज तीन महीने होऊन देखील सर्व विद्यार्थ्यांना इतर कॉलेज मध्ये स्थलांतरित करुन दोन्ही शाखा मधील विद्यार्थ्यांचा रत्नदीप मेडिकल कॉलेजने वसूल केलेल्या फिस चा प्रश्न सोडवला गेलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण झाले त्यांचे शाळा सोडल्याचे दाखले देण्यास रत्नदीप मेडिकल कॉलेज टाळाटाळ करत आहे तसेच , बी फॉर्म विद्यार्थ्यांनी व्यावसायिक परवाना काढण्यासाठी कॉलेज कडून आवश्यक ती कागदपत्रे व आवश्यक त्या ठिकाणी सह्या शिक्के देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होण्याचा भीती निर्माण झाली आहे. तरी वरील सर्व विषयांची विद्यापीठ व प्रशासनाने दखल घ्यावी न्याय मिळावा म्हणून दि 27जून २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजले पासून सर्व विद्यार्थी , सामाजिक जबाबदारी समजून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड तालुका अध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले हे आमरण उपोषणाला बसले आहेत याची नोंद घ्यावी.

तसेच 3 महिन्यापासुन चालु असलेल्या process मधे विद्यार्थ्याच्या college transfer संबधित कुठेही हवा तसा प्रतिसाद पुढिल युनिव्हर्सिटी कडुन भेटला गेला नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे,महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE). जर या घटनेतुन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास वरिल युनिव्हर्सिटी जबाबदार राहतिल.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुढील शैक्षणिक वर्ष 10-15 दिवसात सुरू होत आहेत त्यामुळे त्याबद्दल दक्षता घ्यावी

जर वरील सर्व विषयांची विद्यापीठ व प्रशासनाने दखल घेतली नाही तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे विद्यार्थींनसमेत पुन्हा दि २७ जुन २०२४ पासुन आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबत चे नुकतेच निवेदन जामखेड चे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. निवेदन देता वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, रीपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, गणेश जोशी, बाळासाहेब ढाळे, उत्कर्ष कुलकर्णी सह मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here