गांधी-नेहरु परिवारातील चौथी पिढी एकत्र, महात्मा गांधींचे पणतू यात्रेत सहभागी भारत जोडो यात्रेत नवा इतिहास

0
252

 

जामखेड न्युज——

गांधी-नेहरु परिवारातील चौथी पिढी एकत्र, महात्मा गांधींचे पणतू यात्रेत सहभागी
भारत जोडो यात्रेत नवा इतिहास

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) एक नवा इतिहास रचला गेला. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि पंडित जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांच्या विचारधारा वाहणारे दोन शिलेदार हातात हात घालून एकत्र चालत असल्याचे दृश्य अकोल्यात पाहायला मिळाले. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) भारत जोडो यात्रेत एकत्र चालले.

महाराष्ट्रात आलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा विदर्भात पोहोचली आहे. यावेळी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या परिवारातील चौथी पिढी अकोल्यात एकत्र दिसली. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी हे पंडित जवाहरलाल नेहरु यांचे पणतू राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

जणू काही स्वातंत्र्य लढ्याची पुनरावृत्ती होत आहे, अशा भावना व्यक्त केल्या गेल्या. तुम्ही लोकशाही धोक्यात आणू शकता, पण आम्ही ती नष्ट होऊ देणार नाही, असा संदेश सरकारला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

देशावर इंग्रजांची हुकूमशाही वाढत असताना गांधी नेहरु बाहेर पडले होते, आपल्या देशवासीयांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरले होते, आज राहुल गांधीही तेच करत असताना तुषार गांधीही त्यांच्या साथीला आले, असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं.

दुसरीकडे, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात वाद उफाळून आला आहे. भाजप, मनसे यांनी राज्यभर आंदोलन छेडलं आहे. तर शिवसेनेने कालच त्यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं सांगत हात झटकले होते. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी या कारणावरुन महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा सूचक इशाराही दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here