जामखेड न्युज ——-
जामखेड च्या नेत्यांचे राज्यात वजन मात्र शहरातील नागरिकांसाठी दुषित व गढूळ पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
“स्वच्छ पाणी द्या, अन्यथा आंदोलन” – शहाजी राळेभात यांचा नगरपरिषदेला इशारा

विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांचे राज्यात मोठे वजन आहे. राज्यातील अनेक प्रश्न लावून धरतात व मार्गी लावतात. मात्र त्यांचा जामखेड शहरातील नागरिकांना पिण्यासाठी नळाद्वारे दुषित पाणी मिळत आहे. तेही आठ दिवसांतून एकदा शहरासाठी उजणी धरणातून पिण्याच्या पाण्याची योजना दोन वर्षापासून ऐंशी टक्के काम होऊनही निधीअभावी बाकी काम रखडलेले आहे. जामखेड शहरात सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे तेही गढूळ व दुषित यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकेकाळी चोवीस तास पाणीपुरवठा होणारे शहर म्हणून ओळख असलेल्या जामखेड शहरात सध्या पाणीबाणी सुरू आहे. नळाचे पाणी पिण्यासाठी योग्य नाही. तेव्हा राज्यात वजन असणाऱ्या दोन्ही नेत्यांनी जामखेड च्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.

जामखेड शहरातील सर्व भागात दुषित पाणी येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीवर जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी पाण्याच्या टाकीत शेवाळ व दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून आले.

जर नगरपरिषदेने शहराला स्वच्छ पाणी पुरवठा केला नाही तर पुढील काळात जामखेड तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते शहाजी राळेभात यांनी दिला आहे.बुधवार दिनांक 11 मार्च रोजी तपनेश्वर भागात नळाचे पाणी सुटले होते.




