राज्यात 1021 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर नागरिकांना कोणत्या सवलती मिळणार?

0
1273

जामखेड न्युज——

राज्यात 1021 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर नागरिकांना कोणत्या सवलती मिळणार?

 

राज्य सरकारने पावसाच्या आधारावर राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता आणखी तालुक्यातील सुमारे १०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यासाठी नागरिकांना काही सवलती मिळणार आहेत.


नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 महसूल मंडळांचा समावेश

नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 96 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश आहे.

नगरमध्ये नालेगांव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुई छत्तीशी,

अकोले विरगाव, समशेरपूर, साक्रीवाडी, राजुर, शेंडी, कोतूळ, ब्राम्हणवाडा,

जामखेड – अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव,

कर्जत- राशीन, भांबोरा, कंबोळी, मिरजगाव, माही,

कोपरगाव- रवंदे, सुरेगाव, दहिगाव बोलका, पोहेगाव,

नेसावा खुर्द, नेवासा बुद्रूक, सतलबपुर, कुकाणा,चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा बहिरोबा,

पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हान, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी,

पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी मानूर, करंजी, मिरी,

राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, शिर्डी,

राहुरी बुद्रूक, सात्रळ, ताहाराबाद, देवळाली प्रवरा, टाकळीमियॉ, ब्रॉम्हणी, वांबोरी,

संगमनेर बुद्रूक, धांदरफळ बुद्रूक, आश्वी बुद्रूक, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकुर, पिंपरणे,

शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एंरडगाव,

श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेनगाव, चिंबळा, देवदैठन, कोळेगाव,

श्रीरामपूर, बेलापूर बुद्रूक, उंदिरगाव, टाकळीभान जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे.

अनेक तालुक्यांमधील काही भागांमध्ये चांगली स्थिती असताना तेथे दुष्काळ कसा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी स्वतंत्र महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर न करता तालुका हाच निकष मानून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्याशिवाय जून ते सप्टेंबर या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळले आहे. मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

जून ते सप्टेंबर दरम्यान ४० तालुक्याशिवाय इतर तालुक्यातील ज्या महसुली मंडळांमध्ये सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलीमीटरपेक्षा कमी झाले आहे अशा राज्यातील १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती सरकारने जाहीर केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांचा समावेश आहे.

 

दुष्काळ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती कोणत्या ?

– जमीन महसुलात सूट

– सहकारी कर्जाचे पुनर्गठन

– शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
– कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट
– शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
– रोहयोतंर्गत काच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता

– आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर
– टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे

पर्जन्यमापक नसलेल्या ठिकाणाची माहिती

राज्यातील ज्या मंडळातील पर्जन्यमापक यंत्रे बंद होती अथवा नवीन महसुली मंडळे स्थापन केल्यामुळे त्या महसुली मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रणे अद्याप बसविली गेली नसतील अशा मंडळांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे पाठवावी, असे आदेश सरकारने दिले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here