चौंडीतील दसरा मेळाव्यासाठी धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – बाळासाहेब दोडतले

0
134

जामखेड न्युज——

चौंडीतील दसरा मेळाव्यासाठी धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – बाळासाहेब दोडतले

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणासाठी
यशवंतसेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव चौंडी येथे दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. चौंडी येथे होणा-या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर यशवंतसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी मंगळवारी (ता.१०) चौंडी येथे पत्रकार परिषद घेवून माहिती दिली.यावेळी यशवंतसेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, राष्ट्रीय संघटक गोविंद नरवटे, उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर, नितीन धायगुडे, बाळा गायके, स्वप्निल मेमाणे, दिलीप गडदे, शांतीलाल कोपनर, दत्ताजी काळे, किरण धालपे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दोडतले म्हणाले की, चौंडी येथील उपोषण सोडुन १४ दिवस झाले असले, तरी सरकारकडून अद्याप कुठलीही ठोस भुमिका घेण्यात आलेली नाही. हे सरकार धनगर समाजाची क्रुर थट्टा करत आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी चौंडी येथे दसर्‍या दिवशी धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीत तब्बल २१ दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले होते. यावेळी सरकारने ५० दिवसांची मुदत मागितली होती. मात्र आज १५ दिवस होउनही अद्याप सरकारने आरक्षणा बाबत कसलीही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी यशवंत सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील जन्मगावी धनगर समाजाच्या वतीने दसर्‍याच्या दिवशी धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याला राज्यभरातुन सर्व धनगर बांधवांनी “एक दिवस समाज्यासाठी, एक दिवस आरक्षणासाठी” हे घोषवाक्य घेऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौडी येथे २४ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे २१ दिवस आमरण उपोषण करण्यात आले. मात्र या उपोषणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर बांधवांनी याची गांभिर्याने दखल घेतली पाहिजे. या देशातील चौंडी हे महत्त्वाचे शक्तिपीठ आहे ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव असल्याने याठिकाणी धनगर आरक्षण महामेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी चौंडी येथे धनगर आरक्षणाचे सिमोल्लंघन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब दांगडे म्हणाले , सरकारने पन्नास दिवसांचा वेळ मागितला आहे. सरकार काय करतंय हे सध्या आम्हाला कळायला मार्ग नाही, सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वतीने आंदोलने सुरू आहेत. शासनाने निमंत्रण दिले होते ती बैठक मंबई याठिकाणी झाली. शासनाने लेखी आश्वासन दिले असले तरी १५ दिवस होऊनही सरकारने कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे दसर्‍या दिवशी महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी चौंडी येथे उपस्थित रहावे सरकारला पिवळे वादळ दिसले पाहिजे असेही दांगडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here