जामखेड न्युज——
दडपशाहीमुळे पक्ष सोडून गेलेले फक्त शरीराने गेले मनाने भाजपातच -डॉ सुजय विखे पाटील
मागील तीन वर्षात कर्जत जामखेड मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दडपशाही होती. त्यामुळे अनेकांना पक्ष सोडावा लागला ते शरीराने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले मनाने भाजपातच होते. असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
पत्रकार दिनानिमित्त स्नेह संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमातसाठी आमदार प्रा. राम शिंदे, अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, सोमनाथ पाचारणे, रवी सुरवसे, सलीम बागवान,ज्ञानेश्वर झेंडे, प्रा. अरूण वराट, शरद कार्ले, अरूण म्हस्के, धामणगावचे सरपंच महारुद्र महारनवर, कैलास वराट, महादेव वराट, अंकुश ढवळे, तुषार पवार, गोरख घनवट, मनोज कुलकर्णी, अँड बंकट बारवकर, प्रविण सानप, प्रविण चोरडिया,उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की आमदार प्रा. राम शिंदे यांनी मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडण्यात विद्यमान आमदाराने अडीच वर्षे घातले. मोठ्या प्रमाणावर दडपशाही केली अनेकांवर दबाव आणून पक्ष प्रवेश घडविले. परिसराचा खरा विकास भाजपाच करू शकतो असा विश्वास व्यक्त केला.
पत्रकारांसाठी आवश्यक असलेल्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले. पत्रकारांनी नेहमी वास्तविकता तपासून काम केले पाहिजे. आमच्यावर टिका करा पण आमच्या कामाचे श्रेय आम्हाला द्या असेही सांगितले.
यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी सांगितले की, मी मागच्या दाराने आलो म्हणून टिका करतात पण सरकार पुढच्या दाराने आले आहे. पत्रकारांनी जनसामान्यांच्या उपयोगी पडेल अशी पत्रकारीता करावी असा सल्ला दिला.
यावेळी पत्रकार नासीर पठाण, वसंत सानप, सुदाम वराट, बाळासाहेब शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास वराट यांनी केले तर आभार शरद कार्ले यांनी मानले.