भास्कर मोरेंना अटक करा, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जामखेडकरांचा कडकडीत बंद दोन दिवसात मोरेला अटक न झाल्यास शनिवारी खर्डा चौकात चक्काजाम आंदोलन – विकी सदाफुले

0
634

जामखेड न्युज——

भास्कर मोरेंना अटक करा, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जामखेडकरांचा कडकडीत बंद

दोन दिवसात मोरेला अटक न झाल्यास शनिवारी खर्डा चौकात चक्काजाम आंदोलन – विकी सदाफुले

 

गेल्या आठ दिवसांपासून भास्कर मोरे यांच्या कुकृत्याच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडूरंग भोसले यांचे उपोषण सुरु आहे. आंदोलन कर्ते विद्यार्थी यांना पाठिंबा देण्यासाठी आज जामखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले.


ग्रामस्थांच्या वतीने जामखेड कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. या उपोषणाला व जामखेड बंदला समस्त भिमसैनिक जामखेड तालुका या सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले म्हणाले की, दोन दिवसात डॉ.भास्कर मोरे याला अटक न झाल्यास शनिवारी खर्डा चौकात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला.

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थी मुले व मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचार, आर्थिक आणि मानसिक छळवणूक केली. त्याच्या निषेधार्थ डॉ. भास्कर मोरे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही, म्हणून जामखेडमध्ये बंद पुकारण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात मोठा लढा उभा केला. गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलनकर्ते उपोषण करतायत. मात्र, अद्यापही त्यांना न्याय मिळत नाही. या आरोपीवर गुन्हा दाखल करून अनेक दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील या ठिकाणी जामखेड पोलीस आरोपीला अटक करत नाहीत.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना २४ तासात आरोपीला अटक करतो, असं आश्वासन दिला होतं. मात्र, शंभरहून अधिक तास उलटले आहेत तरी देखील अजूनही आरोपी पोलिसांच्या कचाट्यात आला नाही. याबद्दल पोलीस प्रशासनाला विचारलं असता पोलीस प्रशासनाकडून सारवासारवीचे उत्तर मिळत आहे. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. मात्र, आरोपी चालाख आहे, आमचे तपास काम सुरू आहे. आम्ही आपल्याला सर्व माहिती देऊ शकत नाही, असं पोलीस प्रशासन म्हणतंय. यामुळे आंदोलनकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जामखेडकरांचा पोलीस प्रशासनावर रोष वाढत आहे.

जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्याविरोधात आठ दिवसापासून आंदोलन चालू आहे. आज आंदोलनाचा नववा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर डॉ. भास्कर मोरे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर हरीण पाळल्यामुळे वनविभागानेही गुन्हा दाखल केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ नाशिक या विद्यापीठ समिती यांनी प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. तसेच परिक्षा फॉर्म भरून घेतले जातील यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षकमार्फत अहवाल मागितला आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. यामध्ये दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करणे, नोडल अधिकारी नियुक्त करणे, रत्नदीपची मान्यता रद्द करणे तसेच डॉ. मोरेंवर गुन्हा दाखल होऊन पाच दिवस झाले. पण पोलिसांकडून अद्याप अटक झाली नाही, त्यामुळे आंदोलन चालूच आहे.

आज बुधवार दि.१३ रोजी जामखेड बंदचे आवाहन उपोषणकर्ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, रत्नदीप संस्थेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केले आहे. शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान तसेच ग्रामस्थांच्या वतीने रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा देऊन पालक म्हणून जबाबदारी पार पाडावी, असं आवाहन करण्यात आले आहे. म्हणूनच समस्त जामखेडकरांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जामखेड बंद पुकारत बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता. त्यामुळे इथल्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here